हिंदू धर्मात मृत्यूनंतर का लावतात दिवा?

हिंदू धर्मात मृत्यूनंतर का लावतात दिवा?

हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्या घरी दिवा तेवत ठेवण्याची परंपरा आहे. 

व्यक्ती मरण पावलेल्या दिवसापासून पुढचे दहा दिवस पीठ पसरून त्यावर दिवा तेवत ठेवला जातो. 

बऱ्याचदा मृत व्यक्तीला पुढील मार्ग दिसावा म्हणून हा दिवा लावतात अशी अंधश्रद्धा बाळगली जाते. 

दिवा लावण्यामागे कारण काय आहे याबाबद्दल कोल्हापुरातील पुरोहित कृष्णात गुरव यांनी माहिती दिलीय.

पुनर्जन्मसिद्धांत आणि परलोकविद्या अशा गोष्टी असणारा हिंदू हा एकमेव धर्म आहे. 

जन्मावेळी स्वागत आणि मृत्यूनंतर आत्म्याला सन्मानाने निरोप असे दोन्ही वेळी संस्कार केले जातात. 

दहा दिवसांपर्यंत केल्या जाणाऱ्या अवयवश्राद्धांनी लिंगदेहाची परिपूर्ती होते, अशी मान्यता आहे. 

दिव्याखाली पिठावर मृत व्यक्तीला पुढे कोणता जन्म मिळाला त्याची पावले उमटतात असा समज आहे.

सूचना : ही माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित असून याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी हमी देत नाही.