आजकाल बरेच लोक रात्री उशिरापर्यंत जागतात

रात्री उशिरापर्यंत जागं राहिल्याने तुमच्या मानसिकच नाही तर शारीरिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.

जर झोपेची दिनचर्या दीर्घकाळ विस्कळीत राहिली तर ते गंभीर आजारांचं कारण बनू शकतं.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, जे लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात त्यांना आजार होण्याची अधिक शक्यता असते.

डॉक्टर सांगतात की, रात्री 11 वाजेपर्यंत झोपणं चांगलं.

यापेक्षा जास्त वेळ जागं राहाणं आरोग्याला हानिकारक ठरू शकतं

त्यामुळे निद्रानाशाची समस्या उद्भवते. निद्रानाशामुळे तणावाची पातळी वाढू शकते

सकाळची दिनचर्या खराब होते, ज्यामुळे लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते आणि मधुमेहाचा धोका वाढतो.

एका रिसर्चनुसार रात्री जागून काम करणाऱ्यांमध्ये टाइप 2 मधुमेहाचा धोका दिवसा काम करणाऱ्यांपेक्षा 19 टक्के जास्त असतो.