7 पुणेकरांची सायकलवारी,  8 दिवसांत कन्याकुमारी

पुण्यातील इंडो ॲथलेटिक्स सोसायटीच्या 7 सायकलपटूंनी पुणे ते कन्याकुमारी अंतर सायकलवरून पार केले. 

केवळ 8 दिवसांत 1600 किलोमीटरचे अंतर पार करत त्यांनी आपली मोहीम पूर्ण केली. 

या सायकलपटूंनी आपल्या मोहिमेची सुरुवात इंडो अथेलेटिक सोसायटीच्या पुण्यातील कार्यालयापासून केली. 

कागल येथे पहिला, येल्लापुरात दुसरा तर गोकर्ण महाबळेश्वर दर्शन घेऊन मुरूडेश्वर तिसरा टप्पा पूर्ण केला.

त्यानंतर उडपी, कुन्नुर, गुरुवायूर करत सातव्या दिवशी आलप्पी येथे पोहोचले. 

थिरूअनंतपुरम येथून पुढे जात कन्याकुमारीतील स्वामी विवेकानंद स्मारक येथे शेवटचा टप्पा पार केला.

सर्व टीम मेंबरनी सहकार्य केल्यामुळे ही मोहीम पूर्ण करू शकलो, असे प्रमुख युवराज पाटील यांनी सांगितले.