लग्नासाठी Perfect वय काय?

आधी करियर, मग लग्न ही विचारसरणी आता बऱ्यापैकी रुजली आहे.

भारतात आधी 20 ते 25 वर्ष वय असताना लग्न करणं योग्य मानलं जायचं.

आता 25 ते 30 वर्षात लग्न करणं योग्य मानलं जातं.

तुम्हाला काय वाटतं, लग्नासाठी योग्य वय  काय आहे?

अनेकजण वयाच्या 21-22व्या वर्षी लग्न करून नंतर यशस्वी करियर करतात. तर, अनेकजण आधी करियर करून 28-29व्या वर्षी लग्न करून सुखाचा संसार करतात.

भारतात मुलांसाठी लग्नाचं किमान वय आहे 21 वर्षे आणि मुलींसाठी किमान वय आहे 18 वर्षे.

लग्न करण्यासाठी आपली मानसिक, शारीरिक, आर्थिक स्थिती अनुकूल असेल, आपण जबाबदारी घेण्यासाठी तयार असाल, तर करावं लग्न.

तज्ज्ञ सांगतात की, लग्नानंतर पहिल्या 5 वर्षांमध्ये घटस्फोट होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे लग्नासाठी योग्य वय आहे 28 ते 32 वर्षे.

कारण या वयात लोक अल्लड नसतात आणि जास्त वयस्करही नसतात.