'या' कलाकारांनी केलं अरेंज मॅरेज

लग्नाआधी अभिनेता शाहिद आणि करीना कपूर यांचं अफेअर होतं.

करीनानंतर शाहीदनं मिराबरोबर लग्न केलं. अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचं अरेंज मॅरेज आहे.

अभिनेता विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांच्याही प्रेमाची चर्चा बॉलिवूड इंडस्ट्रीत होती. पण विवेकनं पालकांच्या पसंतीनं प्रियांका अल्वा हिच्याबरोबर लग्न केलं.

अभिनेत्री माधुरी दीक्षितचंही अरेंज मॅरेज आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याच्या अफेअरनंतर माधुरीनं श्रीराम नेनेंबरोबर लग्न केलं.

अभिनेता निल नितीन मुकेश आणि रुक्मिणी यांचंही अरेंज मॅरेज आहे. दोघांनी 9 फेब्रुवारी 2017मध्ये लग्न केलं.

निकितन धीर आणि टेलिव्हिजन अभिनेत्री कृतिका सेंगर यांनीही घरच्यांच्या आवडीनं अरेंज मॅरेज केलं आहे.

अभिनेता करण पटेल आणि अंकिता भार्गव यांचंही अरेंज मॅरेज झालं आहे. 4 मार्च 2015ला त्यांनी लग्न केलं.