नशीब दगा देण्यामागं घरातील या गोष्टी असतात कारण

घरात अशा अनेक गोष्टी असतात, ज्या वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवणं योग्य मानलं जात नाही.

घरात विद्युत उपकरणे, पाण्याचे नळ खराब होणे हे तसे सामान्य वाटते, परंतु या गोष्टी वारंवार खराब होत असतील तर..

घरातील विद्युत उपकरणे राहू दोषाशी संबंधित समस्या दर्शवतात.

राहू दोषामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते, असे मानले जाते.

घराच्या मुख्य ठिकाणांवर लाल स्वस्तिक काढा आणि घरामध्ये कोणतीही अडगळ साचू देऊ नका.

घराच्या उत्तर दिशेला वृक्ष-रोपे लावल्यानं सुख-समृद्धी वाढते.

ईशान्य दिशेला तुळस लावल्यानं घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल.

घराच्या खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवा जेणेकरून सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल.

या उपायांचा अवलंब केल्यानं कुटुंबातील लोकांमध्ये प्रेम टिकून राहते.