महिलांनी कपाळावर टिकली का लावावी?

भारतीय महिलांच्या 16 श्रृंगारातील एक श्रृंगार म्हणजेच म्हणजेच कुंकू किंवा टिकली लावणे.

कपाळावरील भुवयांच्यामध्ये कुंकू किंवा टिकली लावली जाते. लग्न झालेल्या स्त्रियांसाठी कुंकू म्हणजे सौभाग्याचे प्रतीक असते.

परंतु कुंकू किंवा टिकली लावणे हे केवळ आपल्या संस्कृतीचं किंवा सौभाग्याच प्रतीक नसून ते लावल्याने महिलांना आरोग्यासंबंधित अनेक फायदे होतात.

कुंकवात मर्क्युरी म्हणजेच पारा असतो. त्यामुळे कुंकू लावल्याने ताण दूर होतो आणि डोकं शांत राहतं.

लग्नानंतर कुंकू लावण्यामागील कारण आहे की याने रक्ताभिसरण सुधारण्यासह यौन क्षमतादेखील वाढते.

कुंकू महिलांच्या शरीरात ऊर्जा नियंत्रित करते.

कुंकू लावताना आपल्या भांगाच्या आज्ञाचक्रावर दाब दिला जातो त्यामुळे तेथील बिंदू दाबले जाऊन चेहर्‍याच्या स्नायूंना चांगला रक्तपुरवठा होतो.

कुंकू किंवा टिकली लावल्याने महिलांचे सौंदर्य वाढते, त्यांच्या चेहर्‍यावर वेळेपूर्वी सुरकुत्या पडत नाही.

योग विज्ञानाच्या दृष्टीने कुंकवाचा संबंध थेट आपल्या मनाशी जोडला गेलेला आहे.

आज्ञाचक्र महिलांच्या मनाला नियंत्रित करत असते. जेव्हा आज्ञा चक्रावर कुंकू लावल्याने दाब  पडतो तेव्हा मन एकाग्र होते.

अ‍ॅक्यूप्रेशर या उपचार पद्धतीतही भूवयांच्या मधल्या भागाचे महत्व आधारेखित केले आहे. या भागावर रोज प्रेशर दिल्यास अनेक फायदे आपल्या शरीराला होतात.