अशा लोकांच्या सावलीलाही उभारू नये

अशा लोकांच्या सावलीलाही उभारू नये

आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये व्यावहारिक जीवनाविषयी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

खूप गोड बोलणारे लोक : जे नेहमी खूप गोड बोलतात अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. असे लोक आपले काम करून घेण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात

जे लोक नेहमीच तुमच्याशी सहमत असतात किंवा कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला मोठ-मोठी वचनं देतात, अशा लोकांवर विश्वास ठेवू नये.

कारण असे लोक वेळ आल्यावर तुमच्या कामाला येत नाहीत आणि गरजेच्या वेळी दिलेला शब्द देखील पाळत नाहीत.

जे लोक तुमच्यासमोर तुमचे हितचिंतक दाखवतात, परंतु पाठीमागे तुमच्याविषयी वाईट बोलतात अशा लोकांपासून देखील दूर राहावे.

कारण असे लोक तुमचे कधीही नुकसान करू शकतात आणि समाजात तुमची प्रतिमा खराब करू शकतात.

जे लोक खूप स्तुती करतात ते सहसा त्यांच्या फायद्यासाठी खोटी प्रशंसा करून त्यांचे काम पूर्ण करण्यात गुंतलेले असतात.

अशा लोकांसोबत राहून तुम्ही वास्तवापासून दूर राहता. त्यामुळे त्यांच्यापासून नेहमी दूर राहा.

व्यसन आणि चुकीच्या सवयी असलेल्या व्यक्तीपासून दूर राहणे कोणासाठीही चांगले. अशा लोकांची संगत आपलं नुकसान नक्की करते.

गरज असताना एक-दोनदा खोटं बोलणं ठिक आहे. परंतु, प्रत्येक गोष्टीवर आणि अनेकदा खोटं बोलणाऱ्या लोकांपासून तुम्ही अंतर ठेवावे.

असे लोक तुम्हाला कधीही मोठ्या संकटात टाकू शकतात. तसेच कोणाच्याही समोर तुमचा अपमान करू शकतात.