किडनी हा आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे.

जर आपल्या किडनीने काम करणे बंद केले तर काही तासांतच आपला मृत्यू होऊ शकतो.

कारण किडनी शरीरासाठी आवश्यक गोष्टी फिल्टर करते आणि लघवीद्वारे शरीरातील घाण आणि विषारी पदार्थ काढून टाकते.

जेव्हा आपण अनहेल्दी अन्न जास्त प्रमाणात खाऊ लागतो तेव्हा किडनी इतक्या मोठ्या प्रमाणात घाण साफ करू शकत नाही.

त्यानंतर ही घाण किडनीमध्ये जमा होऊ लागते.

त्यामुळे किडनी साफ करणंही महत्त्वाचे आहे. यासाठी काही भाज्या खूप उपयुक्त ठरतील.

पालक - पालकामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि फोलेट असते

ज्याचे नियमित सेवन मूत्रपिंडाच्या कोणत्याही आजारापासून बचाव करते आणि पेशी निरोगी ठेवते.

लाल शिमला मिरची योग्य आहे कारण त्यात पोटॅशियम कमी असते आणि त्यात अनेक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतात.

याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी6, फॉलिक अॅसिड आणि फायबर असते जे किडनी निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असते

किडनीशी संबंधित समस्या असतील तर लसणाचा वापर करा. लसणाला अँटिऑक्सिडंट्सचे पॉवरहाऊस म्हणतात.

फुलकोबी - फुलकोबी ही किडनीसाठी खूप चांगली भाजी आहे.

किडनीतील घाण साफ करण्यात ती तज्ञ आहे. फुलकोबीमध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट आणि फायबर असते.

यासोबतच यात अनेक प्रकारचे कंपाउंड असतात जी किडनीमध्ये जमा झालेल्या विषाच्या प्रभावाला नाहीसं करतात.