या दोन गोष्टींमुळे माणसाचं आयुष्य बनतं नरक

महान मुत्सद्दी आणि अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांचे धोरणात्मक विचार जगप्रसिद्ध आहेत.

जे लोक वासनेच्या आधिन आहेत, ते अन्य गोष्टी पाहू शकत नाहीत.

आणि ज्या व्यक्ती अहंकारी असतात, त्यांना आपण काही वाईट करतोय याची जाणीव नसते.

जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि शांततामय जीवनासाठी आचार्य चाणक्य यांनी काही महत्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत.

बुध्दीमान व्यक्ती या आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवून, जागा, वेळ आणि क्षमता याची पूर्ण काळजी घेत आपले लक्ष्य पूर्ण करतात.

चाणक्य निती सांगते ,माणसाने कोणत्याही परिस्थितीत समाधानी राहायला शिकलं पाहिजे.

याविषयी ते त्यांच्या श्लोकात म्हणतात- कालः पचति भूतानि कालः संहरते प्रजाः. कालः सुप्तेषु जागर्ति कालो हि दुरतिक्रमः॥

आचार्य चाणक्य म्हणतात की, काळाच्या पुढे कोणीही धावू शकत नाही. जेव्हा कोणाची वेळ येते तेव्हा त्याला कोणी रोखू शकत नाही.

वेळेला किंमत न देणाऱ्याचं आयुष्य मातीमोल होऊन जातं. एकदा गेलेली वेळ काही केल्या परत येत नाही. त्यामुळे वेळेचे भान राखा, कोणतीही गोष्ट नियोजनबद्ध जणू वेळापत्रक लावून करायला हवी.