'या' लेव्हलच्या वर गेल्यास जीवघेणी ठरू शकते ब्लड शुगर!

'या' लेव्हलच्या वर गेल्यास जीवघेणी ठरू शकते ब्लड शुगर!

देशात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सर्व वयोगटातील लोक त्याला बळी पडत आहेत. 

वृद्धांबरोबरच तरुणांनाही हल्ली मधुमेहाचा त्रास होणे सामान्य झाले आहे. 

याचे कारण चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैली असल्याचे मानले जाते. मधुमेह असाध्य आजार आहे. 

योग्य आहाराबरोबरच रक्तातील साखरेच्या रुग्णांना व्यायामाचाही सल्ला दिला जातो.

मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या रक्तातील साखरेची पातळी नेहमी नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

140 mg/dL पेक्षा कमी रक्तातील साखरेची पातळी सामान्य मानली जाते.

जर ते 200 mg/dL च्या वर असेल तर याचा अर्थ तुमची साखर वाढली आहे.

जेव्हा रक्तातील साखरेची पातळी 300 किंवा 400 mg/dl पर्यंत पोहोचते, तेव्हा एखाद्याला खूप तहान लागते. यामध्ये वारंवार लघवीला जावे लागते. 

याशिवाय अशक्तपणा, अस्वस्थता, दृष्टी अंधुक होणे, पोटदुखी अशा तक्रारी वाढू लागतात.

ब्रेडसारखी कर्बोदके खाऊ नये. आपल्या आहारात फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा.

मधुमेहाच्या रुग्णाने दिवसातून किमान 2 ते 3 लिटर पाणी प्यावे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.