कॅन्सरवर मात करण्यासाठी मांसाहार करावा का? 

कॅन्सरवर मात करण्यासाठी मांसाहार करावा का? 

सध्याच्या काळात निरोगी जीवनासाठी आहार चांगला असणं गरजेचं आहे. 

योग्य आहार घेतल्यास कॅन्सरग्रस्त रुग्णही आजारावर लवकर मात करू शकतात. 

सध्याच्या काळात महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका आणि प्रमाण वाढले आहे. 

ऑक्टोबर हा स्तन कर्करोग जनजागृती महिना म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. 

ज्या महिलांना कॅन्सर किंवा केमोथेरेपी झालेली आहे, त्यांनी आहारावर लक्ष देणं गरजेचं आहे. 

छत्रपती संभाजीनगर येथील आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी याबाबतच माहिती दिली आहे. 

कॅन्सरग्रस्त रुग्णांना जंकफूड, मसाल्यांचे पदार्थ, मांसाहारी पदार्थ देणं टाळावं.

रुग्णांना आवळा, बीट, गाजर यांचा रस द्यावा जे शरीरासाठी चांगलं असतं. 

रुग्णांना तळलेले किंवा कच्चे पदार्थ खाण्यास देणे टाळावे. शक्यतो उकडून, वाफवून देणे चांगले राहते. 

भिजवून बदाम, ड्रॅगन फ्रुट, सीताफळ सारखी फळे तुम्ही देऊ शकता.