50 झाडांनी बनवलं लखपती 

50 झाडांनी बनवलं लखपती 

आपल्या देशातील बहुतांश जनता ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र दुष्काळ, बाजारभावाचे गणित आणि निसर्गातील असमतोल यामुळे शेती हा घाट्याचा सौदा ठरत आहे.

मात्र अनेक शेतकरी पारंपारिक पिकांना फाटा देऊन वेगवेगळी पिके घेऊन शेती फायदेशीर ठरवत आहेत.

जालना जिल्ह्यातील मार्डी येथील शेतकरी दत्ता राऊत यांनी देखील अशीच किमया केली आहे. केवळ सव्वा एकर क्षेत्रावर चिकू शेती फुलवून त्यांनी तब्बल 3 लाखांचे उत्पन्न मिळवले.

दत्ता राऊत हे मार्डी या अंबड तालुक्यातील छोट्याशा गावचे रहिवाशी आहेत. त्यांचे वडील शेषराव राऊत यांनी काही वर्षांपूर्वी एक चिकू बाग खरेदी केली. 

यातून त्यांना चिकू शेती विषयी माहिती मिळाली. 1995 मध्ये त्यांनी स्वतःच्या सव्वा एकर शेतामध्ये 33 बाय 33 अंतरावर 50 चिकू झाडांची लागवड केली. 

अवघ्या पाचच वर्षांमध्ये चिकू झाडांना फळे लागण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला उत्पन्न कमी मिळत असलं तरी त्यामध्ये आंतरपीके देखील घेतली.

आता ही झाडे तब्बल तीस वर्षांची झाली आहेत. एका झाडापासून तब्बल दीड क्विंटल चिकूचे उत्पन्न होत आहे.

सव्वा एकर शेतात चिकू फळबागांची लागवड करून 50 झाडांतून वर्षाला सरासरी अडीच ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

हमाल कसा झाला उद्योगपती?