कोल्हापुरातील चौकात का उडतायेत पाण्याचे फवारे?

कोल्हापुरातील चौकात का उडतायेत पाण्याचे फवारे?

सध्याच्या काळात इतर शहरांप्रमाणेच कोल्हापुरातही हवा प्रदुषण ही गंभीर समस्या बनत आहे. 

या हवा प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. 

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत मिळालेल्या निधीमधून अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

शहरातील मध्यवर्ती चौक दाभोळकर कॉर्नर येथे एअर प्युरिफायर मशीन बसविण्यात आली आहे. 

आता असेच मिस्ट टाईप फाउंटन शहरातील इतरही प्रमुख चौकांत बसवण्यात येणार आहेत. 

यामुळे हवा प्रदूषणात घट होण्यास मदत होईल, असे मत अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी व्यक्त केले.

हे फाऊंटन साधारण 15 फूट उंचीचे असून त्यांतून पाण्याचे फवारे हवेत सोडले जाणार आहेत. 

त्यामुळे हवेतील धूलिकण पाण्याच्या दवबिंदू प्रमाणे बारीक थेंबांसोबत खाली येतील. 

कॅनव्हासवर अवतरली हुबेहुब जुनी मुंबई