गूळ जितकं चविष्ट असतं तितकंच आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
यात आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतं.
दररोज गूळ खाल्ल्याने शरिराला अनेक फायदे मिळतात.
डॉक्टर संजीव पाठक यांनी याबाबत माहिती दिली आहे.
गुळामुळे शरिरातील टाकाऊ पदार्थ सहज बाहेर पडतात.
यामुळे त्वचा चमकदार होते, अन्नपचनही व्यवस्थित होतं.
आंबट ढेकर येण्याचा त्रासही गुळामुळे दूर होतो.
तसंच गुळामुळे मानसिक तणाव दूर होण्यासही मदत मिळते.