संध्याकाळी चुकूनही करू नका 'ही' कामं, दारातून माघारी जाईल लक्ष्मी!

लक्ष्मी देवीला मानलं जातं धनाची देवता.

लक्ष्मी देवीचं आगमन न झाल्यास घरात अठराविश्वे दारिद्र्य निर्माण होऊ शकतं.

त्यामुळे संध्याकाळच्या वेळी घरातलं वातावरण कायम प्रसन्न असायला हवं.

देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल सांगतात की,

संध्याकाळच्या वेळी कधीच झोपू नये किंवा लोळत पडू नये.

संध्याकाळी कोणालाच किचनमधलं सामान उधार देऊ नये.

संध्याकाळी तुळशीची पानं खुंटू नये.

संध्याकाळी घराच्या उंबरठ्यावर बसू नये.

यामुळे देवी लक्ष्मी मागच्या मागे परत जाऊ शकते आणि घरात दारिद्र्य निर्माण होऊ शकतं.

सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.