दहाव्या दिवशी का बरं करतात बाप्पाचं विसर्जन?

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थीच्या दिवशी झाला बाप्पाचा जन्म, असं मानलं जातं.

या गणेश चतुर्थीपासून महाभारताचं लिखाण कार्य सुरू झाल्याचा उल्लेख पुराणात आढळतो.

असं म्हणतात की, महर्षी वेदव्यासांनी गणपतीला केली होती महाभारताची रचना लिहिण्याची विनंती.

त्यानंतर गणपतीने 'आता माझी लेखणी थांबणार नाही', असं म्हणत केली होती लिहायला सुरुवात.

महाभारताचं लिखाण सलग 10 दिवस चाललं. 

अनंत चतुर्दशीच्या दिवशी जेव्हा महाभारत लिहून पूर्ण झालं, तेव्हा बाप्पाचं शरीर झालं होतं स्थिर.

10 दिवस अजिबात हालचाल न केल्याने बाप्पाच्या अंगावर साचली होती धूळ, माती.

बाप्पाने सरस्वती नदीत स्नान करून शरीर केलं स्वच्छ.

त्यामुळे 10 दिवस विधिवत पाहुणचार करून अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशमूर्तीचं केलं जातं विसर्जन.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)