ब्रेकअपनंतरही 'या' कलाकारांमध्ये आहे चांगली मैत्री

रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण रिलेशनमध्ये होते. पण त्यांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतही दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत.ब्रेअकपनंतर त्यांनी तमाशा सारखा सिनेमा एकत्र केला होता.

ऋतिक रोशन आणि सुझॅन यांचंही लग्न मोडलं असली तरी ते पालक आहेत. एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यांनी 200 साली लग्न केलं.2014मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 

'लव्ह आज कल' या सिनेमाच्या सेटवर कार्तिक आणि सारा अली खान एकमेकांना डेट करत होते. सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं. आजही ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत.

अभिनेत्री मलायका आणि अरबाज खान आपल्या आयुष्यात पुढे गेले असले करी ते मुलगा अरहानसाठी आजही चांगले पालक आहेत. अनेकदा त्यांना मुलाबरोबर एअरपोर्ट एकत्र पाहिलं गेलंय. 

2014मध्ये फरहान अख्तरआणि अधुना भाबानी यांचा घटस्फोट झाला. आजही त्यांच्यात मैत्री आहे. मुलीसाठी नेहमीच एकत्र येतात. 

अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटानंतरही चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. पण आमिर आणि किरण आजही चांगले मित्र आहेत.