भारतातील सर्वात रहस्यमयी किल्ला
भारतात अनेक रहस्यमय ठिकाणे आहेत, पण आज आम्ही तुम्हाला अशाच एका किल्ल्याबद्दल सांगणार आहोत.
या किल्ल्याबद्दल जाणून तुम्हाला नक्कीच भीती वाटल, पण याबद्दल जाणून घेण्याची देखील तुमची इच्छा होईल. चला मग याबद्दल सविस्तर माहिती मिळवू
भारतात असे अनेक किल्ले आहेत, ज्यांचे स्थापत्य आणि सौंदर्य मनाला भुरळ घालते.
पण भानगडचा किल्ला सगळ्यात झपाटलेलं ठिकाण म्हणून ओळखलं जातं.
सूर्यास्तानंतर चुकूनही कोणी या किल्ल्यावर राहिलं तर त्या रात्री काय घडलं हे सांगायला कोणीही परत येत नाही.
भानगड किल्ल्यात भुताची भीती इतकी आहे की, सरकारने सूर्यास्तानंतर येथे राहण्यास बंदी घातली आहे.
हे ठिकाण रहस्यमय असल्याने अनेकांचे लक्ष वेधून घेते.
साहसी किंवा ऍडवेंचर्स लोकांना या ठिकाणी एकदा भेट द्यायला नक्कीच आवडेल.
हा किल्ला अलौकिक क्रियाकलापांचे केंद्र आहे. येथे रात्रीच्या वेळी भुत फिरताना दिसतात असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.