या गोष्टी न केल्यास कशी राहील घरात सुख-शांती 

सनातन धर्मात वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे.

पंडित अरुणेश मिश्रा यांच्या मते वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या घरात काही बदल करा. 

असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळेल.

तुळशीचे रोप घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत पूर्व, उत्तर दिशेला लावा.

घराच्या ईशान्य दिशेला देव्हारा असावा, देव्हाऱ्यासाठी ही दिशा सर्वोत्तम मानली जाते

आग्नेय दिशेला अग्नी कोनात स्वयंपाकघर असावे.

गॅसची शेगडी पूर्व दिशेला ठेवून स्वयंपाक बनवल्यानं कुटुंब निरोगी राहतं.

घराच्या उत्तर दिशेला रंगीबेरंगी फुले लावावीत.

घरातील नळातून पाणी टपकत राहिल्यानं आर्थिक नुकसान होऊ शकते.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही