चातुर्मास्य कधी संपणार, त्यानंतरच लग्नांसाठी मुहूर्त

हिंदू धर्मात तुळशी विवाहाला खूप महत्त्व आहे. या दिवशी चातुर्मास्य समाप्त होतो.

या दिवशी देवउठनी म्हणजे प्रबोधिनी एकादशी असते.

या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांनी क्षीरसागरात झोपलेल्या स्थितीतून जागे होतात, असे मानले जाते.

चातुर्मास्य संपल्यामुळे या दिवसापासून लग्न, गृहप्रवेश, जावळ इत्यादी शुभ कार्ये सुरू होतात.

कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला तुळशीविवाह असतो.

यंदा तुळशी विवाह 24  नोव्हेंबरला साजरा होणार आहे. म्हणज त्याच दिवशी चातुर्मास्य समाप्त होईल.

या दिवशी तुळशीचा विवाह श्रीकृष्णाशी केला जातो.

याशिवाय महिला या दिवशी उपवास करतात.

देशभरात तुळशी विवाह मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही